रोजच्या संपर्कातील लोकांचा संघर्ष आपल्याला माहिती असून त्याचे गंभीर्य नसते
कधी कधी आपल्या रोजच्या संपर्कातील लोकांचा संघर्ष आपल्याला माहिती असून त्याचे गंभीर्य नसते.बघा ना आपल्या आईचा चेहरा तुम्ही शेवटचा कधी निरखून पाहिला आहे.नसेल तर आजच पहा,तुम्हाला जाणवेल कधी बदल झालाय तुमच्या आईच्या चेहऱ्यात.रोजचीच माणसे,रोजच्याच भेटी मुळे त्यांचे संघर्ष आपल्याला समजून उमजत नसतात.चित्रपटातील हिरो आपला आदर्श ठरतो मात्र आपल्याला लहानाचे मोठे करणारे वडील,दिवसरात्र काळजी घेणारा भाऊ हे खरे हिरो आपण कानाडोळा करतो.मोबाईल मध्ये जर एखाद्या मित्राचा नंबर सेव्ह असला तर त्याचा कॉल आपण उचलत नाही मात्र एखादा अननोन नंबर आला की एका रिंग मध्ये उचलतो.अनोळखी व्यक्तीविषयी कमालीची उत्सुकता असते आपल्याला पण ओळखीची लोक मात्र नकोसे वाटतात.बघा ना जेव्हा नवीन लग्न होते तेव्हा बायकोची किती काळजी करतो नवरा मात्र जसा जसा संसार फुलतो तसा तसा जगतिक सर्वात क्रूर व्यक्ती म्हणजे बायको होते त्याच्यासाठी.स्त्री साठी जगातील सर्वात बाद माणूस म्हणजे तिचा नवरा.रोज रोज तीच माणसे,त्यांच्या सवयी माहिती होतात,त्यांचे विक पॉईंट्स,त्यांचे दोष दिसून येतात आणि त्या नात्यातील रस संपतो.मग अशावेळी बाहेरील सुख शोधण्या...