खूप कमी वेळ मिळतो मला नवीन काही लिहायला.तसा माझ्या लिहण्याचा विषय प्रेम नाही.पण या विषयावर लिहताना मेंदूतील विचार कधी शब्दांचे रूप घेतात समजून सुद्धा येत नाही.स्त्री असो वा पुरुष दोघांनाही परस्परांविषयी खूप आकर्षण असते.बालवयातून तारुण्यात पदार्पण करताना आपल्यावर चित्रपट, टीव्ही सिरियल्स,नाटके यातून बरेच चुकीचे प्रोग्रामिंग घडते.प्रेमासारख्या पवित्र गोष्टीला आपण किती विचित्र पद्धतीने जीवनात उतरवतो. मी पण तुमच्यापैकीच आहे."प्रेम" या शब्दाच्या आडून अतिशय किळसवाणे प्रकार मी देखील पचवले. मात्र अखेर प्रेमानेच मला दिशा दिली.जीवनाकडे पहायची एक नवी दृष्टी दिली.एखाद्याचे जीवन केवळ परिवर्तित करून नव्हे तर जिवंतपणी त्याचा दुसरा जन्म घडवण्याची विलक्षण किमया केवळ प्रेमात असते. एखाद्याच्या आयुष्यात खरं प्रेम येत.ते दोघेही बेधुंद होऊन जीवन जगतात.आयुष्यातील हा अनमोल कालखंड.मंडळी, आयुषयात तुम्ही अब्जावधी रुपये जरी ओतले तर या मखमली काळातील दिवस विकत नाही घेऊ शकत.ईश्वर या सृष्टीतील प्रत्येकाला हे दिवस प्रदान करतो.पण,कान असून बहिरे,तोंड असून मुके,डोळे असून आंधळे असणाऱ्या आपल्याला या काळाचे